कर्जमाफी योजना तीन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. आणि सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी देण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर हे तीन टप्पे कशे असणार आहे बघुयात.
कर्जमाफीचे तीन टप्पे कोणते?
पहिला टप्पा – 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा – 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ओटीए (OTA) प्रक्रिया राबवली जाणार आहे.
तिसरा टप्पा – तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रिया सुरू होऊ शकते.

